साने गुरुजी मराठी माहिती | Sane Guruji Marathi Mahiti
प्रस्तावना
Sane Guruji Marathi Mahiti मित्रांनो आज आपण आजच्या लेखामध्ये परम पूज्य साने गुरुजी मराठी माहिती | Sane Guruji Marathi Mahiti या विषयावर आधारित माहिती लिहिण्यासाठी हा लेख हाती घेतला आहे. या लेखाचे आपण वाचन केल्यानंतर आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर करा.
Sane Guruji Marathi Mahiti परमपूज्य साने गुरुजी यांची 124 वी जयंती निमित्त आपण हा आज लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे.साने गुरुजी या नावाने साऱ्या महाराष्ट्राला परिचित झालेले होते. त्याकाळी गुरुजींना ओळखत नाही, असा एकही माणूस शोधून सापडणे मुश्किल होते. Sane Guruji Marathi Mahiti
सनी सनी गुरुजींनी आपल्या जीवनात अनेक भूमिका प्राण ओतून वठविल्या आणि आपल्या समर्पणा च्या वृत्तीने त्यांना अजरामर करुन ठेवल्या. त्यातली महत्त्वाची आणि भावी पिढीला आकार देणारी भूमिका होती शिक्षकाची जीवनात महत्त्वाचे महान कार्य करून भावी पिढीला समाज प्रबोधन करण्याच्या संदर्भात मोठी भूमिका त्यांनी गुरुजी या शब्दातून वर्णन केल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात सर्व लोक साने गुरुजी या नावाने ओळखतात.Sane Guruji Marathi Mahiti
साने गुरुजी मराठी माहिती Sane Guruji Marathi Mahiti
साने गुरुजी हे पदवी प्रमाणपत्र घेऊन नोकरी करणारे, पोटार्थी शिक्षक नव्हते. शिक्षकी पेशा त्यांनी व्रत म्हणून स्वीकारला होता. कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक शिक्षण नसताना, केवळ आत्म्याच्या उर्मी तून, नवनिर्मितीच्या ध्यासा तून गुरुजीं मधला शिक्षक तयार झाला होता. ते मातृ हृदयी शिक्षक होते. शाळा ही मुलांना कोंडून ठेवण्याच्या कोंडवाडा नसून, विद्यार्थ्यांवर वेगवेगळे संस्कार करून बघण्याची ती एक प्रयोगशाळा आहे, असं गुरुजी मानत. शिक्षकी व्यवसाय, पैसा कमविण्यासाठी अथवा दोन वेळच्या जेवणाची बेगमी होण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला नव्हता. त्याकाळी पारतंत्र्यात असलेल्या देशाला स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशीचा महामंत्र देण्यासाठीच जणू गुरुजींनी, विद्यादानाचे कार्य हाती घेतले असावे. Sane Guruji Marathi Mahiti
साने गुरुजी परिचय,शिक्षण व कार्य
साने गुरुजींनी पुण्याच्या न्यू पुणे कॉलेजमधून १९२४ साली एम. ए. साठी ऍडमिशन घेऊन, द्वितीय श्रेणीत एम. ए. पूर्ण केले. १७ जून १९२४ साली अमळनेरच्या खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये, त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली. १७ जुलै १९०८ साली स्थापन झालेल्या खानदेश एज्युकेशन सोसायटीने प्रथम विद्यामंदिर शाळा सुरू केली. ती कालांतराने १७ जुलै १९३४ साली प्रताप हायस्कूल म्हणून नावारूपाला आली. स्वातंत्र्याची आणि स्वदेशा ची चळवळ या काळात जोरावर होती. त्याच्या परिणाम संस्था चालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यां वरही झालेला होता. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढे फार लौकिक मिळविल्या च्या नोंदी आहेत. .' Sane Guruji Marathi Mahiti 'साने गुरुजींची धडपडणारी मुले म्हणून ती प्रसिद्ध होती. Sane Guruji Marathi Mahiti
साने गुरुजी आणि विद्यार्थी सहसंबंध
साने गुरुजींना मुलं आणि फुलं फार आवडत. मुलांच्या आणि फुलांच्या सानिध्यात प्रत्यक्ष परमेश्वराचा सहवास लाभतो, असा त्यांचा मानस होता. नवीन काही करावे, हा ध्यास त्यांच्या मनाला सतत पछाडून टाकी. त्या दृष्टीने शिक्षकी व्यवसायात त्यांच्या कर्तुत्वाला नवीन धुमारे फुटले. मुलांच्या निरागसतेतून च त्यांना जीवनाचे धडे देण्याचे कार्य गुरुजींनी सुरू केले. प्रताप विद्यामंदिर फक्त शाळा न राहता, कर्म शाळा बनली. Sane Guruji Marathi Mahiti
साने गुरुजींचे राहण्याचे ठिकाण
गुरुजी प्रताप विद्या मंदिरच्या वसतीगृहात च रहात. जे आजही आनंद भुवन म्हणून ओळखले जाते. प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना, या आनंद भुवन वसतीगृहात राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. ज्या कर्मभूमीत गुरुजी राहिले, तेथली माती कपाळी लावताना अंगावर रोमांच उभे राहिले होते. जीवन कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले होते. पुढे शिक्षण संपल्यावर आयुष्यभर गुरुजी सारखं शिक्षण क्षेत्रात, मलाही ज्ञानदानाचे कार्य करता आले, हे मी माझे संचीत समजतो. Sane Guruji Marathi Mahiti
साधी राहणी व उच्च विचार सरणी
साने गुरुजी चे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा गुरुजींचा स्थायीभाव होता. तो त्यांच्या वर्तनातून, वागण्या-बोलण्यातून, राहणीमानातून स्पष्टपणे दिसत असे. लांबकोट, काळी टोपी, ठसठशीत मिश्या आणि गळ्याभोवती उपरणे गुंडाळलेल्या गुरुजींची मूर्ती सात्विक वाटे. पायघोळ धोतर नेसलेले गुरुजी पुस्तका विना सहसा दिसत नसत. अगदी प्रवासात देखील त्यांच्याजवळ पुस्तकं असत. गाडीत, रेल्वेत फार काय वेटिंग रूम मध्ये देखील, ते फावल्या वेळात पुस्तक वाचून, आपली ज्ञानाची तहान भागवीत असत. असा ज्ञान पीपासू व वेळेचे महत्त्व जाणणारा शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय व्हायला वेळ लागला नाही. गुरुजींनी लवकरच विद्यार्थ्यांची मने जिंकली होती. Sane Guruji Marathi Mahiti
साने गुरुजी चे अध्यापन कार्य
शिक्षण शास्त्राचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना, गुरुजींचे अध्यापन आदर्श होते. आदर्श शिक्षकांच्या अंगी असावेत, असे सारे गुण त्यांच्या ठाई होते. वर्गात शिकवताना गुरुजी कधीही खुर्चीत बसून शिकवत नसत. शिकवताना त्यांना पाठ्य पुस्तकाची ही गरज पडत नसे. कारण, विद्यार्थ्यांप्रमाणे ते स्वतः वर्गात शिकवायच्या विषयाचा सखोल अभ्यास घरुन करून येत. विषय शिकवतांना त्यांनी वेळेच्या आणि वेळापत्रकाच्या मर्यादेत स्वतःला मर्यादित करून घेतले नव्हते. एखादा विषय शिकवताना दुसऱ्या विषयाचा संदर्भ आला, तर ते त्या विषयावरही सर्वांकष चर्चा करीत. त्यांची माहिती व शिकवण्याची पद्धत इतकी अद्यावत असे, की विद्यार्थी तासंतास त्यांच्या शिकवण्यात मंत्रमुग्ध होत. पुढे गुरुजींचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले. त्यांनी आपल्या आठवणीत लिहून ठेवलेले आहे की, गुरुजी आम्हाला शिकवत होते हे सांगताना आम्हाला फार अभिमान वाटतो. वर्गात शिकवताना धड्या तील कारुण्य प्रसंगांनी रडलेले गुरुजी त्यांना पाहता आले. गुरुजीनाही आपण शिकवलेल्या कारुण्य रसात साश्रू पूर्ण नेत्रांनी डुंबले ले विद्यार्थी पाहता आले. संवादाने मना मना च्या तारा जुळवणा रे धन्य ते गुरुजी आणि धन्य ते विद्यार्थी.Sane Guruji Marathi Mahiti
गुरुजींचे अष्टपैलू नेतृत्व
साने गुरुजींनी आपल्या व्यवसायात तन-मन धन अर्पण केले. कर्म ज्ञान आणि त्यागाचा वसा घेतला. गांधी विचारांवर नितांत श्रद्धा ठेवली. यातूनच त्यांचे ओजस्वी, तेजस्वी व्यक्तिमत्वाला बहर आला. गुरुजींनी जीवनात संयम ,विवेक ,सेवा, प्रेम आणि सहकार्य यांना फार महत्त्व दिले. स्वच्छता, टापटीप आणि शिस्त त्यांना प्रिय होती. कोणतेही काम करण्यात त्यांनी कमीपणा वाटून घेतला नाही. त्यांनी मुलांवर आई सारखं प्रेम केलं. त्यांना मातृ हृदयी शिक्षक ही ओळख मिळाली. यामुळेच विद्यार्थी व सहकार्यांमध्ये ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. Sane Guruji Marathi Mahiti
साने गुरुजी छात्रालय प्रमुख
शालेय अध्यापनाचे काम करत असतानाच गुरुजी वर छात्रालय प्रमुखांची जबाबदारी येऊन पडली. गुरुजींचा बहुतांशी वेळ विद्यार्थ्यांच्या सानिध्यात जात असे. गुरुजी, छात्रालयात असलेल्या विद्यार्थ्यांचे आई-बाप, भाऊ, मित्र होते. कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्यांशी ते सहज संवाद साधत. त्यास आपलंस करून टाकत. छात्रालयात विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडवता येतो, हे गुरुजींनी पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना मायेने स्वावलंबन, सचोटी, सहकार्य, स्वाभिमान, देशाभिमान व बंधुभाव या गोष्टी शिकविल्या. शिक्षक म्हणजे वेगळा प्राणी, असे ते समजत नसत. खोटी प्रतिष्ठा कुरवाळत बसण्यापेक्षा, मुलांमध्ये मुलांसारखे होऊन राहण्यात त्यांना आनंद वाटे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्यांच्याबद्दल उगाच भीती वाटत नसे. त्यांचे कार्यालय विद्यार्थ्यांनी सतत गजबजलेले राही. त्याकाळी शिक्षकांना विद्यार्थी दचकून असत. ती भीती गुरुजींनी सहज दूर केली होती. Sane Guruji Marathi Mahiti
छात्रालयात प्रभात समयी, गुरुजी सर्वांना प्रेमाने उठवीत. त्यांना हवं नको ती चौकशी करीत. आजारी विद्यार्थ्यांची सेवा सुश्रुषा करीत. वेळप्रसंगी त्यांचे मल-मूत्र ही आवरी त. माय च्या प्रेमाची पखरण करणाऱ्या शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना प्रेम, आपुलकी, ममता वाटली नाही, तर नवलच नाही का ? मात्र, अशाही परिस्थितीत काही टार्गेट आळशी विद्यार्थीही असत. गुरुजी त्यांना शिक्षा न करता, त्यांची कामे स्वतः करून टाकीत. यातून विद्यार्थी वरमाय चे, शरमाय चे . मग ते गुरुजींची माफी मागत. अशाप्रकारे गुरुजी दगडात ही देवपण आणीत असत. गुरुजी स्वतः कष्ट सोसत. स्वतःहून सर्वांना समजून घेत. समजून सांगत. यातून विद्यार्थ्यांमध्ये आपोआप सुधारणा दिसून येत असे. संयम हा गुरुजींचा महत्त्वाचा गुण. त्यामुळे आपल्या शिकवण्याच्या तात्काळ परिणामांची, त्यांना अपेक्षा नसे. ते वाट पाहायला तयार असत. मात्र, गुरुजी काही वेळा संतापत. संतापले म्हणजे त्यांच्या संताप वरच्या श्रेणीचा असे. अश्यावेळी ते स्वतःला शिक्षा करुन घेत. अबोला धरत. ही शिक्षा मुलांना सहन होत नसे. ते तात्काळ गुरुजींची माफी मागत. Sane Guruji Marathi Mahiti
साने गुरुजी चे व्यक्तिमत्व
Sane Guruji Marathi Mahiti विद्यार्थ्यांशी सर्वार्थाने एकरूप झाला, तोच खरा शिक्षक. असे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची मन वाचू शकतात. त्यांचा आनंद, त्यांचे दुःख, त्यांच्या अडचणी, आशा-अपेक्षा जाणून घेऊ शकतात. त्यावर उपायही करतात. त्यांच्या भविष्याला आकार देतात. साने गुरुजी असेच शिक्षक होते. त्यांनी अनेकांच्या अडचणी ओळखल्या. त्या सोडविल्या. कुणाच्या शाळेचे फी दरमहा भरली. कुणाच्या पुस्तकांचा खर्च उचलला. कित्येकांची जेवणाची सोय केली. अनेकांची प्रत्यक्ष सेवा केली. यासाठी, त्यांनी स्वतःच्या खर्चावर मर्यादा घातल्या. पोटाला चिमटा दिला. मात्र, कुणालाही हिरमुसलं होवू दिलं नाही. यामुळे, त्यांच्या पगारातील फार थोडा भागच त्यांच्या वाट्याला येई. त्यातही ते आनंदी राहत असत. त्यांचा आनंद भौतिक गोष्टींवर अवलंबून नव्हता. तो त्यांच्या स्वतःच्या मनाच्या निर्मळते वर अवलंबून होता.
छात्रालय म्हणजे एक प्रयोगशाळा
साने गुरुजी विद्यार्थ्यांवर वेगवेगळे प्रयोग करीत. शाळा आणि छात्रालय हे विद्यार्थ्यांना संस्कार आणि ज्ञानाची दीक्षा देणारी प्रयोगशाळा आहे, असे ते मानत. निसर्ग हा खरा शिक्षक असून, ज्ञानदानाचे कार्य चार भिंतीच्या वर्गात बसून करण्याचे काम नाही, अशीही त्यांची धारणा होती. नव्हे, तसा त्यांना विश्वास होता. म्हणून, वर्गात शिकवीत असताना एखाद्या वेळी पाऊस सुरू झाला, तर ते शिकवणं थांबवून, मुलांना निसर्गाच्या वर्षाधारांच्या नृत्याविष्कार पाहायला मुक्त सोडू देत. त्यांच्या अशा वागण्यात कामचुकारपणा नव्हता. याची वरिष्ठांनाही कल्पना होती. गुरुजी जे करतील, ते चांगलेच करतील आणि त्यात विद्यार्थ्यांचे हित च दडलेले असेल,Sane Guruji Marathi Mahiti असा विश्वास त्यामागे असायचा.
समानतेची शिकवण
साने गुरुजी शिकवत असतांनाच, गुरुजी विद्यार्थ्यांना समतेची शिकवण देत. अतिशय छोट्या छोट्या, साध्या साध्या प्रसंगातून महामंत्र देण्याची कला त्यांच्या ठाई होती. एखाद्या विद्यार्थ्याने आणलेला डबा अथवा खाऊ ते इतरांना वाटत. अशावेळी त्या निष्पाप लेकरांना जात-पात, धर्म, पंथ शिवू शकत नसे. आपला खाऊ दुसऱ्याला देण्यासाठी लागणारी मनाची विशालता, अशा प्रसंगातून गुरुजी विद्यार्थ्यांत निर्माण करीत. उच्च-निच्च हा भेदाभेद त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये येवू शकला नाही. जगात फक्त एकच धर्म असून तो फक्त प्रेम करणं शिकवतो, असं गुरुजी म्हणत. या उदात्त विचारातून त्यांच्या, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन पद दलीत, तया जावून उठवा वे.! या प्रार्थनेचा जन्म झाला.Sane Guruji Marathi Mahiti
त्यांच्या शाळेतील गड्या साठी म्हणजेच नोकरीसाठी त्यांनी सोसले ले कष्ट, मुलांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. शाळेतील गड्या साठी त्याच्या अंत्य समयी त्याला बंधू मानून गुरुजींनी च अग्नी डाग दिला. यापेक्षा विशाल बंधु प्रेमाचे उदाहरण मुलांना कुठे दिसणार होते. अशा दीपस्तंभ सारख्या शिक्षकांची शिकवण, मुले कशी विसरतील. असे प्रसंग, अशा घटना विद्यार्थ्यांच्या मनःपटला वर प्रकाश टाकत. आणिSane Guruji Marathi Mahiti अनपेक्षितपणे त्यांना दिव्य ज्ञानाचा लाभ होई. कृतीतून विद्यार्थी धडा शिकत. धन्य ते विद्यार्थी. धन्य ते शिक्षक. असा शिक्षक पुन्हा होणे नाही.
स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग
तो काळ स्वातंत्र्य संग्रामाचा काळ होता. गुरुजी सारख्या सहनशील व्यक्तीला ही पारतंत्रा ची जोखड झुगारा विशी वाटत होती. त्यांना शाळा आणि छात्रालयाचे क्षेत्र मर्यादित व बंदिस्त वाटू लागले होते. स्वातंत्र्यलढ्यात आपणही खऱ्या अर्थाने सहभागी व्हावे, असे त्यांना वाटले. त्यांनी पूज्य बापूजीं ची आज्ञा आणि दिक्षा घेवून स्वातंत्र संग्रामात उडी घेतली. २९ एप्रिल १९३० साली गुरुजींनी शाळा सोडली. ते स्वातंत्र्यसैनिक झाले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. देशात शेतकऱ्यांचे राज्य यावे, असे त्यांना वाटे. देशात स्वातंत्र्याचे वारे वहात होते. सारा देश पेटून उठला होता. गुरुजींनी ही आपली शब्दांची मशाल पेटवली. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण.! असे सूर गुंजु लागले. विविध ठिकाणी सभा रंगू लागल्या. माणसं पेटू लागली. देश भक्तीने प्रेरित होऊ लागली. स्वातंत्र्यसंग्रामात झोकून देऊ लागली. यामागे उभी होती एक संयमी, अबोल, अमोघ शक्ती. सेनानी साने गुरुजी. एका आदर्श शिक्षकाचे, एका राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्य सैनिकात रूपांतर झाले होते. वेळप्रसंगी शिक्षकाला आपली भूमिका बदलवता आली पाहिजे, हेच गुरुजींनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले. अशी महान माणसं आपल्या वागण्या, बोलण्यातून आणि जगण्यातून इतिहास घडवतात."Sane Guruji Marathi Mahiti "पू. गुरुजींच्या स्मृतिं ना विनम्र अभिवादन.!
सारांश
साने गुरुजी अष्टपैलू नेतृत्व असणारे गुरुजी म्हणून नावारूपाला आले. साने गुरुजी यांनी लिखाणही सुद्धा केले. ते एक कवी होते. त्यांनी अनेक गीत लिहिले. गर्जा महाराष्ट्र माझा हे महत्त्वपूर्ण लिखाण आज महाराष्ट्रात प्रत्येक शाळेत परिपाठात विद्यार्थ्या कडून गायन केले जात आहे.साने गुरुजी ची श्यामची आई ही कादंबरी वाचल्यानंतर आपणास गुरुजी कसे निर्माण झाले आणि त्यांनी त्या कादंबरीतून केलेले वर्णन आजही विद्यार्थ्यांना प्रेरणा प्राप्त करून देणारी अशी ती कादंबरी आहे. परमपूज्य साने गुरुजींच्या महान कार्यास सलाम. आता असे गुरुजी होणे अशक्यप्राय गोष्ट आहे. Sane Guruji Marathi Mahiti
FAQ
1) साने गुरुजी चे पूर्ण नाव काय होते?
उत्तर -साने गुरुजी चे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. ज्यांना साने गुरुजी म्हणून ओळखले जाते ते एक प्रसिद्ध मराठी लेखक शिक्षक आणि समाजसेवक होते.
2) श्यामची आई ही कादंबरी कोणी लिहिली?
उत्तर -श्यामची आई ही कादंबरी साने गुरुजी यांनी लिहिलेली.
3) साने गुरुजी ची शैक्षणिक पात्रता काय होती?
उत्तर -साने गुरुजी यांची शैक्षणिक पात्रता एमए मराठी द्वितीय श्रेणी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता त्यांची होती.
4) साने गुरुजी ने प्रथम कोणती शाळा सुरू केली?
उत्तर -साने गुरुजींनी प्रथम प्रताप हायस्कूल ही शाळा सुरू केली होती. या शाळेची स्थापना इसवी सन 1928 मध्ये स्थापन केली होती.
5) साने गुरुजी यांनी स्वातंत्र्यलढ्यात केंव्हा सक्रिय सहभाग घेतला?
उत्तर -महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली 29 एप्रिल 1930 मध्ये सक्रिय सहभाग घेतला. साने गुरुजी यांचे स्वातंत्र्यलढ्यातील काम फार महान ठरले.
विविध माहिती प्राप्त करण्यासाठी आपण आमचे खालील महत्त्वपूर्ण लेख वाचू शकता.

